विराट आणि रोहितच्या जाण्यामुळे तरुणांना संधी मिळेल : गंभीर   

मुंबई : रोहित शर्माने ८ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर फक्त चार दिवसांनी १२ मे रोजी, विराट कोहलीनेही या क्रिकेट प्रकारामधून निवृत्ती घेतली. दोन्ही दिग्गजांच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. माध्यमांच्या अहवालामध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघेही ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करू इच्छित होते.पण आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. तो म्हणाला की, दोन दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला  
 
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही कबूल केले की, विराट आणि रोहितच्या जाण्यामुळे तरुणांना संधी मिळेल, परंतु त्यांची जागा घेणे सोपे नसेल.
 गंभीर म्हणाला, हो, ते कठीण असेल, पण निश्चितच लोक हात वर करतील. जर कोणी निघून गेले तर असा खेळाडू येऊ शकतो, जो देशासाठी काहीतरी खास करू शकेल.गौतम गंभीरने चॅम्पियन्स  चषकाचे उदाहरण देत म्हटले की, जसप्रीत बुमरा नसतानाही  भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. गंभीरने हे सांगण्याचा प्रयत्न केला की, भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंशिवायही पुढे जाऊ शकतो.तसेच निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.
 
एखाद्या खेळाडूने कधी कारकीर्द संपवायची याचा निर्णय खेळाडूवर अवलंबून असतो.  मला वाटते कधी खेळायला सुरुवात करता आणि कधी निवृत्ती घ्यायची, हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.
 

Related Articles